(१) अर्थात त्यांना मुस्लिम बनवून तुमचा बांधव आणि साथीदार बनवावे, ज्यामुळे तुमची आपसातील शत्रुता, मैत्रीत रुपांतर होईल आणि असेच घडले. मक्का विजयानंतर लोक समूहासमूहांनी इस्लाम धर्म स्वीकारू लागले आणि ते मुस्लिम होताच घृणाचे रूपांतर प्रेमात झाले. कालपर्यंत जे मुलसमानांचे रक्तपिपासू वैरी होते, ते त्यांचे जीवश्च कंठश्च बनले.