(१) हे कर्म (अर्थात ईमान राखणे व जिहाद करणे) व्यापार या अर्थाने घेतले आहे, कारण याच्यातही त्यांना व्यापारासारखा लाभ होईल आणि तो लाभ कोणता आहे? जन्नतमध्ये प्रवेश आणि जहन्नमपासून मुक्ती. तेव्हा याहून मोठा लाभ आणखी काय असेल? याच गोष्टीला दुसऱ्या एका ठिकाणी अशा प्रकारे सांगितले गेले आहे- ‘इन्नल्लाहस्तरा मिनल्मुअ्मिनीन अ््न्फ़ुसहुम् व अम्वालहुम् बिअन्न लहुमुल्जन्नत.’ ‘‘अल्लाहने ईमान राखणाऱ्यांशी त्यांच्या प्राणआंचा व संपत्तीचा सौदा जन्नतच्या बदल्यात केला आहे.’’ (सूरह तौबा-१११)
(१) सर्व परिस्थितीत आपल्या वचनांद्वारे आणि आचरणाद्वारे तसेच धन आणि प्राणाद्वारेही, जेव्हा आणि ज्या वेळी देखील आणि ज्या अवस्थेतही अल्लाह आणि त्याचा पैगंबर आपल्या धर्माच्या मदतीसाठी हाक मारील, तुम्ही त्वरित त्यांच्या हाकेला होकार देऊन म्हणाल, आम्ही हजर आहोत, ज्याप्रमाणे हजारोंनी हजरत ईसा यांच्या आवाहनावर म्हटले होते. (२) हे यहूदी होते, ज्यांनी ईसा (अलै.) यांच्या प्रेषितत्वाचा केवळ इन्कारच केला नाही किंबहुना त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर लांझनही लावले. काहींच्या मते हा मतभेद आणि अलगाव त्या वेळी झाला जेव्हा हजरत ईसाला आकाशात उचलून घेतले गेले. एक म्हणाला की ईसा यांच्या रूपात अल्लाह (ईश्वर) च धरतीवर प्रकट झाला होता. (असे सनातन धर्मात ईशदूतांना अवतार मानले गेले आहे.) आता तो पुन्हा आकाशात चालला गेला. हा पंथ ‘याकूबिया’ संबोधिला जातो. ‘नस्तुरिया’ पंथाचे लोक म्हणाले की ते (हजरत ईसा) अल्लाहचे पुत्र होते. पित्याने पुत्राला आकाशात बोलावून घेतले. तिसरा असे म्हणाला की ते अल्लाहचे उपासक आणि त्याचे पैगंबर (संदेशवाहक) होते. अर्थात हे सांगणारा संप्रदायच खरा व उचित होता.