(१) फरिश्त्ये प्राण काढण्यासाठी माणसाच्या शरीरात असे पोहत फिरतात, जणू पाण्यात तळाशी जाणारा पाणबुड्या मोती काढण्यासाठी समुद्रात अगदी खोलवर पोहत फिरतो किंवा असा अर्थ की अतिशय वेगाने फरिश्ते अल्लाहचा आदेश घेऊन आकाशातून उतरतात कारण वेगवान घोड्यालाही ‘सबिअ’ म्हणतात.
(१) अर्थात त्याने ईमान आणि आदेशाचा केवळ इन्कारच केला नाही तर धरतीत उत्पात माजविण्याचा आणि हजरत मूसाशी सामना (विरोध) करण्याचा प्रयत्न करीत राहिला आणि जादूगारांना एकत्र करून मूसा (अलै.) यांच्याशी सामना करविला यासाठी की त्यांना खोटे ठरविले जाऊ शकावे.
(१) अर्थात तुमचे काम केवळ ‘इन्ज़ार’ (भय दाखविणे) आहे, परोक्ष (गैब) च्या वार्ता देणे नव्हे, ज्यात कयामतचे ज्ञान आहे जे अल्लाहने कोणालाही दिले नाही. ‘मनयख्शाहा’ अशासाठी म्हटले आहे की तंबी (चेतावणी) आणि धर्म-प्रचाराचा खरा लाभ त्यालाच मिळतो, ज्याच्या मनात अल्लाहचे भय असते, अन्यथा खबरदार करण्याचा आणि संदेश पोहचविण्याचा आदेश तर प्रत्येक माणसाकरिता आहे.