(१) मृत्यु तर अटळ आहे, परंतु जर मृत्यु असा यावा की त्यानंतर मनुष्य अल्लाहच्या माफी आणि दया-कृपेस पात्र ठरावा तर हे या जगाच्या धन-दौलतीपेक्षा अधिक चांगले आहे, जिला जमा करण्यात मनुष्य संपूर्ण आयुष्य खपवितो. यास्तव अल्लाहच्या मार्गात संघर्ष करण्यापासून मागे हटू नये याच्याशी लगाव असला पाहिजे, कारण याद्वारे अल्लाहतर्फे माफी आणि दया-कृपा प्राप्त होते. तथापि यासोबत मनाचे पावित्र्यही आवश्यक आहे.