(१) किंवा एक उद्देश आणि सत्यासह निर्माण केले आहे, व्यर्थ नाही आणि तो उद्देश हा की नेक सदाचारी लोकांना सत्कर्मांचा मोबदला आणि दुराचारी लोकांना त्यांच्या दुष्कर्मांची शिक्षा दिली जावी, म्हणजे, काय ते आपल्या अस्तित्वावर विचार चिंतन करीत नाही की कशा प्रकारे त्याला तुच्छतेपासून उच्चता प्रदान केली आणि पाण्याच्या एका तुच्छ थेंबापासून त्याची रचना केली, मग आकाश व जमिनीला एका खास हेतुसाठी लांब रुंद केले. याखेरीज त्या सर्वांसाठी एक निर्धारित वेळ ठरवली, अर्थात कयामतचा दिवस, ज्या दिवशी हे सर्व काही समाप्त होईल. याचा अर्थ असा की जर यांनी या सर्व गोष्टींवर विचार केला असता तर निश्चितपणे अल्लाहचे अस्तित्व, तो रब (स्वामी व पालनकर्ता) असण्याची आणि उपासनायोग्य असण्याची आणि त्याच्या असीम सामर्थ्याची त्यांना जाणीव झाली असती, त्यांना तसे ज्ञान लाभले असते आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी ईमान राखले असते.
(१) सहभाग्यांशी अभिप्रेत त्या काल्पनिक (मिथ्या) देवता होत, ज्यांची त्यांचे उपासक या श्रद्धाने पूजा करत होते की हे अल्लाहजवळ आमची शिफारस करतील आणि आम्हाला अल्लाहच्या अज़ाबपासून वाचवतील. परंतु इथे अल्लाहने हे स्पष्ट केले की अल्लाहसोबत दुसऱ्यांनाही ईश्वर ठरविणाऱ्यांकरिता, अल्लाहच्या ठिकाणी, कोणीही शिफारस करणार नसेल.