(१) अर्थात ईमान राखण्याच्या स्थितीत, तुमच्या मृत्युचा आणि जो निर्धारित आहे, तो टळून तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करील आणि तो अज़ाब तुमच्यावरून दूर करील, जो ईमान न राखण्याच्या स्थितीत तुमच्या नशिबी होता. या आयतीद्वारे हे सांगितले गेले आहे की, आज्ञापालन, सत्कर्म व सदाचरण, नातेवाईकांशी सद्व्यवहार केल्याने आयुष्य वाढते. हदीसमधील उल्लेखानुसार ‘मिल्लतुर्रहीमी तज़िजुफील उमुर.’ ‘‘नातेवाईकांशी सद्व्यवहार आयुष्य वाढण्याचे कारण आहे.’’ (इब्ने कसीर)
(१) ही नूह यांच्या जनसमूहातील पाच सदाचारी माणसे होती, ज्यांची ते लोक उपासना करत असत आणि त्यांची एवढी ख्याती झाली की असब देशातही त्यांची पूजा होत राहिली. उदा. ‘वद्द’ दूमतुल जनदल (ठिकाणी) कल्ब कबिल्याचा, ‘सुवाअ’ समुद्रतटाचा कबिला हुजैलचा, ‘यगूस’ सबाजवळील जुर्फ नावाच्या ठिकाणी मुराद व बनू गुतैफचा. ‘यऊक’ हमदान कबिल्याचा आणि ‘नस्र’ हिम्यर जमातीचा कबिला जुल कलाअचा उपास्य होता. (इब्ने कसीर, फतहुल कदीर) हे पाचही लोक नूह जनसमूहाचे नेक सदाचारी लोक होते. जेव्हा हे मरण पावले, तेव्हा सैतानाने त्यांच्या श्रद्धाळूंना म्हटले की त्यांचे चित्र (फोटो) बनवून आपल्या घरात आणि दुकानात ठेवा, यासाठी की त्यांचे स्मरण राहावे आणि त्यांचे ध्यान धरून तुम्हीही सत्कर्म करीत राहा. जेव्हा हे चित्र बनवून ठेवणारे मरण पावले, तेव्हा त्याच्या वंशजांना सैतानाने हे सांगून शिर्कच्या अपराधात ग्रस्त केले की तुमचे पूर्वज तर यांची भक्ती उपासना करीत असत. ज्यांचे चित्र तुमच्या घरांमध्ये लावलेले आहे, यास्तव त्यांनी त्यांची पूजा सुरू केली. (सहीह बुखारी, तफसीर सूरह नूह)