(१) अर्थात परिस्थिती कितीही कठीण असो, ईमानावर अटळ राहावे, त्यापासून परावृत्त होऊ नये. काहींनी कायम राहण्याचा अर्थ निष्कपटता असा घेतला आहे, म्हणजे केवळ एक अल्लाहचीच उपासना व आज्ञा पालन करणे. जसे हदीस वचनात उल्लेखित आहे की एका माणसाने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना विनंती केली, ‘‘मला अशी गोष्ट सांगा की तुमच्यानंतर मला दुसऱ्या कोणाला विचारण्याची गरज न भासावी,’’ त्यावर पैगंबरांनी फर्माविले, ‘‘सांगा, मी अल्लाहवर ईमान राखले, मग यावर अटळ राहा.’’ (सहीह मुस्लिम किताबुल ईमान बाबु जामिअे औसाफिल इस्लाम)
(१) हे मोठे महत्त्वपूर्ण नैतिक मार्गदर्शन आहे की दुराचाराला सदाचाराने टाळा, अर्थात दुराचाराचे उत्तर उपकाराने, अत्याचाराचे क्षमाशीलतेने, क्रोधाचे. धैर्य संयमाने आणि अप्रिय गोष्टींचे, समजावून सांगून दिले जावे अशाने दूरचा जवळ आणि रक्तपिपासू तुमचा चाहता आणि जीवलग दोस्त बनेल.