(१) या आयतीत अल्लाहतर्फे सवड देण्याचा नियम सांगितला आहे. अर्थात अल्लाह आपल्या नियम व मर्जीनुसार काफिरांना सवड देतो. ठराविक अवधीकरिता त्यांना ऐहिक सुख-सुखसमृद्धी, धन-संपदा आणि संतती प्रदान करतो. लोकांना वाटते की त्यांच्यावर अल्लाहच्या दया-कृपेचा वर्षाव होत आहे. परंतु जर अल्लाहने प्रदान केलेल्या सुख-समृद्धीने लाभान्वित होणारी पुण्यप्राप्ती आणि अल्लाहच्या आज्ञापालनाचा मार्ग पत्करणार नाहीत तर हे ऐहिक सुख अल्लाहची कृपा-देणगी नाही, अल्लाहतर्फे देण्यात आलेली सवड आहे. ज्यामुळे त्यांच्या कुप्रनीतीत आणि अवज्ञा करणयात उत्तरोत्तर वाढहोते. परिणामी शेवटी ते जहन्नमची महाभयंकर आगीची शिक्षा-यातना भोगण्यास पात्र ठरतात.