(१) अर्थात पैगंबर पाठविल्याविना आणि त्यांच्याद्वारे सावधान केल्याविना जर आम्ही एखाद्या जनसमूहाला नष्ट केले असते तर हा अत्याचार ठरला असता. आम्ही असे कधीही केले नाही किंबहुना न्याय - नियमानुसार प्रथम त्यांना खबरदार केले, त्यानंतर जेव्हा त्यांनी पैगंबराचे म्हणणे मानले नाही, तेव्हा आम्ही त्यांचा नाश केला. हाच विषय सूरह बनी इस्राईल - १८ आणि सूरह अल कसस - ५९ मध्येही उल्लेखिला गेला आहे.