(१) एखाद्याला जर ऐहिक धन संपत्ती खूप जास्त लाभत आहे, वास्तविक तो अल्लाहचा अवज्ञाकारी आहे, तर ही खूप आनंदित आणि बेपर्वा होण्याची बाब नव्हे, कारण ही संधी आहे. न जाणो केव्हा ही मुदत संपेल आणि माणूस अल्लाहच्या पकडीत सापडेल. (२) हदीस वचनात उल्लेखित आहे की या जगाचे मूल्य आखिरत अर्थात मरणोत्तर जीवनाच्या तुलनेत असे आहे की जणू एखाद्याने आपले बोट समुद्रात बुडवून बाहेर काढावे तेव्हा पाहावे की समुद्राच्या अफाट जलाशयाच्या तुलनेत त्याच्या त्या बोटात केवढे पाणी आले?