(२) ही आयत त्या सहाबांविषयी अवतरली आहे, ज्यांनी याप्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याचे आश्चर्यजनक कारनामे दाखविले होते आणि त्यांच्यात ते सहबादेखील होते जे बद्रच्या लढाईत सामील होऊ शकले नव्हते, परंतु त्यांनी ही प्रतिज्ञा केली होती पुन्हा जर एखादी संधी लाभली तर जिहाद (धर्मयुद्धा) मध्ये भरपूर भाग घेतील. उदा. नज़र बिन अनस वगैरे जे शेवटी लढता लढता ओहदच्या युद्धात शहीद झाले. त्यांच्या शरीरावर तलवार, भाले आणि बाणांचे ऐंशीच्या वर घाव होते. शहादतनंतर त्यांच्या बहिणीने त्यांना, त्यांच्या बोटावरून ओळखले. (मुसनद अहमद, हिस्सा ४, पृ. १९३)