(१) इस्लामच्या आगमनापूर्वी हादेखील अत्याचार होता की स्त्रियांना आणि लहान मुलांना वारस या नात्याने काहीच दिले जात नव्हते. केवळ मोठी मुले, जी लढण्यायोग्य असत तेच साऱ्या संपत्तीचे उत्तराधिकारी मानले जात. या आयतीत सर्वश्रेष्ठ अल्लाहने फर्माविले की पुरुषांप्रमाणे स्त्रिया आणि लहान मुले-मुलीदेखील आपल्या माता-पित्याचे आणि नातेवाईकांचे वारसदार ठरतील. त्यांना वारसाहक्कापासून वंचित ठेवले जाणार नाही.