(१) कयामतच्या दिवशी काफिरांना अर्थात इन्कारी लोकांना, ना त्यांची धन-संपत्ती कामी येईल, ना त्यांची मुले.येथेपर्यंत की भल्या कामात खर्च केलेले धनदेखील व्यर्थ ठरेल आणि त्यांची तुलना त्या कडाक्याच्या थंडीसारखी आहे, जी हिरव्या टवटवीत शेतीला जाळून तिचा सर्वनाश करते. त्यापूर्वी अत्याचारी लोक आपली डोलणारी शेते पाहून खूप आनंदित होत असत आणि मोठ्या फायद्याची आशा धरत की अचानक त्यांच्या आशा अपेक्षा धुळीस मिळतात. थात्पर्य, जोपर्यंत ईमान नसेल, तोपर्यंत भल्या कामांसाठी खर्च करणाऱ्यांची या जगात कितीही प्रसिद्धी व प्रशंसा का होईना, आखिरतमध्ये त्यांना याचा काडीमात्र मोबदला मिळणार नाही. तिथे तर त्यांच्यासाठी दररोज जहन्नमच्या आगीत निरंतर जळत राहण्याची महाभयंकर शिक्षा (अज़ाब) आहे.