(१) मूळ शब्द ‘ग़ैब’ याचा अर्थ अशा गोष्टी ज्यांचे समाधान बुद्धी आणि अकलेद्वारे नाही. उदा. अल्लाहचे अस्तित्व, वहीये इलाही (अवतरीत संदेश), जन्नत, जहन्नम, फरिश्ते, कबरीचा अज़ाब, हश्र (कर्मांचा हिशोब) होणे इत्यादी. तात्पर्य अल्लाह आणि पैगंबरानी सांगितलेल्या खबरींवर बुद्धी, कयास, आभासाविना अटळ विश्वास राखणे ईमानचा भाग आहे आणि यांचा इन्कार करणे कुप्र आणि गुमराही (नकार व मार्गभ्रष्टता) आहे.
(१) बिघाड सुधारणेच्या विरूद्ध आहे. कुप्र (सत्य धर्माचा इन्कार) आणि अपराध, दुराचारामुळे धरतीवर उत्पात व उपद्रव माजतो अर्थात बिघाड पसरतो आणि अल्लाहच्या आदेशाचे पालन केल्याने शांती सुबत्ता लाभते.
(१) या आयतीत ‘व्यापार’शी अभिप्रेत सरळ आणि सत्य मार्गाला सोडून मार्गभ्रष्टतेत पडणे अर्थात हा उघड असा हानिकारक सौदा आहे.
(१) तौहीद (अल्लाहला एक मानणे आणि फक्त त्याचीच उपासना करणे) नंतर आता रिसालत (प्रेषितत्वा) विषयी सांगितले जात आहे. आम्ही आपल्या दासावर जो ग्रंथ अवतरीत केला तो अल्लाहतर्फे उतरविल्या जाण्याबाबत जर तुम्हाला शंका-सवंशय आहे. तेव्हा तुम्ही आपल्या सर्व मदत करणाऱ्यांसह मिळून यासारखी एक तरी सूरह (अध्याय) बनवून दाखवा आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की वास्तविक हा ग्रंथ एखाद्या मानवाने रचलेला ग्रंथ नाही. किंबहुना सर्वश्रेष्ठ अल्लाहचाच ग्रंथ आहे. तेव्हा अल्लाहवर आणि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या प्रेषितत्वावर ईमान राखून जहन्नमच्या भयंकर आगीपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करा. कारण जहन्नमची ती आग काफिरांसाठी अर्थात इन्कार करणाऱ्यांसाठीच निर्माण केली गेली आहे.
(१) हा पवित्र कुरआनाच्या सत्यतेचा एक स्पष्ट पुरावा की अरब देश आणि प्रदेशातील सर्व इन्कारी लोकांना आव्हान दिले गेले, परंतु आजपर्यर्ंत याचे उत्तर देऊ शकले नाही आणि खात्रीने कयामतीपर्यंत ते असे करू शकणार नाहीत.
(१) इब्लीसने आदमला सजदा करण्यास म्हणजे आदमपुढे माथा टेकण्यास नकार दर्शविला आणि अपमानित झाला. कुरआनानुसार इब्लीस जिन्नांपैकी होता, परंतु अल्लाहने त्याला सन्मानपूर्वक फरिश्त्यांमध्ये सामील करून घेतले होते, यास्तव अल्लाहच्या आदेशानुसार त्यानेदेखील सजदा केला पाहिजे होता, परंतु द्वेष आणि घमेंडीमुळे त्याने सजदा करण्यास इन्कार केला. अर्थात द्वेष, गर्व आणि घमेंड ते पाप होय, जे मानवविश्वात सर्वांत प्रथम केले गेले आणि ते करणारा इब्लीस होता.
(१) ‘‘थोड्याशा किंमतीवर विकू नका’’ याचा अर्थ असा कदापि नाही की जास्त किंमत मिळाल्यास अल्लाहच्या आदेशाचा सौदा करा, किंबहुना याचा अर्थ असा की अल्लाहच्या आदेशाच्या तुलनेत ऐहिक लाभाला मुळीच महत्त्व देऊ नका. अल्लाहचे आदेश तर इतके मौल्यवान आहेत की साऱ्या जगाची सामग्री आणि चीजवस्तू त्यांच्या तुलनेत तुच्छ आहेत. आयतीत इस्राईलच्या पुत्रांकडे संकेत केला गेला असला तरी हा आदेश कयामतपर्यंत सर्व मानवांकरिता आहे. जो कोणी सत्याला सोडून असत्याची बाजू धरेल किंवा अज्ञान दाखवून केवळ ऐहिक लाभासाठी सत्याकडे पाठ फिरविल, त्याला हा आदेश लागू पडतो.
(१) सबूरी आणि नमाज दोन्ही अल्लाहवाल्यांचे दोन मोठे शस्त्र आहेत. नमाजद्वारे एका ईमानधारकाचा अल्लाहशी संबंध सहजपणे होतो, ज्यामुळे त्याला अल्लाहची प्रसन्नता व सहायता लाभते.धीर सयंम राखल्याने त्याच्या चारित्र्यात दृढता आणि धर्मपालनात स्थैर्यशिलता निर्माण होते.
(१) मूळ शब्द ‘आले फिरऔन’शी अभिप्रेत केवळ फिरऔन आणि त्याचे कुटुंबच नव्हे तर फिरऔनचे समस्त साथीदार आहेत.
(१) अधिकांश भाष्यकारांच्या मतानुसार त्या वस्तीशी अभिप्रेत बैतुल मुकद्दस होय.
(२) अर्थात अल्लाहसमोर आभार मानत, नम्रतापूर्वक प्रवेश करा.
(३) अर्थात ‘‘आमच्या अपराधांना क्षमा कर.’’
(१) अर्थात ते लोक, जे जरूर सुरवातीच्या काळात एखादा सत्य-धर्म मानणारे असतील. यास्तव कुरआनात यहूदी, ख्रिश्चनांसोबत त्यांचा उल्लेख आला आहे परंतु नंतरच्या काळात, त्याच्यात फरिश्त्यांची पूजा करण्याची प्रथा पडली किंवा ते नास्तिक झाले. या कारणास्तव धर्महीन लोकांना साबी म्हटले जाऊ लागले.
(१) ही जादूदेखील त्या वेळे पर्यंत कोणाला नुकसान पोहचवू शकत नाही जोपर्यंत अल्लाहचा आदेश आणि मर्जी नसेल, यास्तव ती शिकण्याचा काय फायदा? याच कारणास्तव इस्लामने जादू शिकण्यास आणि करण्यास कुप्र (इन्कार) म्हटले आहे. प्रत्येक प्रकारची भलाईची कामना आणि नुकसानापासून बचाव करण्याकरिता केवळ अल्लाहशीच दुआ- प्रार्थना केली जावी, कारण तोच प्रत्येक गोष्ट करणारा आहे आणि प्राणीमात्राचे प्रत्येक काम त्याच्याच मर्जीने होते.
(१) ‘‘ते अशा प्रकारे वाचतात, जसा त्याच्या वाचनाचा हक्क आहे.’’ याचे अनेक अर्थ सांगितले गेले आहेत. उदा. १. ‘‘अगदी लक्षपूर्वक वाचतात’’, जन्नतचे वर्णन आल्यावर जन्नतची अभिलाषा धरतात, तसेच जहन्नमचे वर्णन आल्यावर तिच्यापासून बचाव व्हावा अशी दुआ करतात. २. यात सांगितलेल्या हलाल (वैध) ला हलाल आणि हरामला हराम समजतात आणि अल्लाहच्या ग्रंथात फेरबदल करीत नाही, जसे इतर ग्रंथधारक करीत. ३. त्यात जे काही लिहिले आहे, ते लोकांना सांगतात, त्यातली एकही गोष्ट लपवीत नाही. ४. यातल्या स्पष्ट गोष्टींच्या अनुसार आचरण करतात, अस्पष्ट (संदिग्ध) गोष्टींवर ईमान राखतात आणि ज्या गोष्टींचे आकलन होत नाही, त्या धर्मज्ञानींकडून समजून घेतात.५. त्यातल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतात.
(१) ग्रंथाशी अभिप्रेत पवित्र कुरआन आणि हिकमतशी अभिप्रेत हदीस.
(१) अर्थात ईमानची व्यापक व्याख्या ही की सर्व पैगंबरांना अल्लाहतर्फे जे काही मिळाले किंवा त्यांच्यावर अवतरीत झाले, त्या सर्वांवर ईमान राखले जावे. कोणत्याही ग्रंथाचा किंवा पैगंबराचा इन्कार केला जाऊ नये. एखाद्या ग्रंथाला किंवा पैगंबराला मानणे, आणि दुसऱ्याचा नकार दर्शविणे ही गोष्ट पैगंबरांच्या दरम्यान फरक जाहीर करते, जी इस्लामच्या मते उचित नाही. तथापि आता आचरण मात्र पवित्र कुरआनच्या नियम आणि आदेशांना अनुसरून होईल. पूर्वीच्या अवतरीत ग्रंथातील आदेशानुसार नव्हे. कारण प्रथम तर ते ग्रंथ आपल्या मूळ स्वरूपात नाहीत. फेरबदल झालेले आहेत आणि दुसरे हे की कुरआनने त्या सर्वांच्या आदेशांना रद्द केले आहे.
(१) या आयतीत पुन्हा लाभ आणि आचरणाची श्रेष्ठता विशद करून थोर बुजुर्ग आणि महात्मा वगैरेंशी नाते किंवा त्यांच्यावर भरोसा व्यर्थ सांगितला गेला आहे. कारण, (‘‘ज्याला त्याच्या कर्माने मागे सोडले, त्याचा वंश त्याला पुढे नेणार नाही.’’) (सहीह मुस्लिम) अर्थात थोर बुजुर्गांच्या चांगल्या कामाने तुम्हाला काही फायदा आणि त्यांच्या वाईट कर्मांविषयी तुम्हाला काही विचारले जाणार नाही, किंबहुना त्यांच्या कर्मांविषयी तुम्हाला किंवा तुमच्या आचरणाबाबत त्यांना विचारणा केली जाणार नाही.
“कोणीही कोणाचे ओझे उचलणार नाही.’’ (सूरह फातिर-१८)
“माणसाकरिता तेच काही आहे, ज्याच्यासाठी त्याने प्रयत्न केला.’’ (सूरह अल नजम-३९)
(१) मूळ शब्द ‘वसातुन’ याचा अर्थ मध्य (मधला), परंतु हा शब्द मोठेपणा आणि श्रेष्ठता या अर्थानेही वापरला जातो. इथेही याच अर्थाने वापरला गेला आहे.
(१) ही ताकीद यापूर्वी दिली गेली आहे. हेतु मुस्लिम जनसमूहाला सावध करणे आहे की कुरआन आणि हदीसचे ज्ञान प्राप्त झाल्यावरही बिदअतवाल्यांच्या मागे लागणे अत्याचार आणि भटकणे होय.
(१) अत्याचारींचे भय बाळगू नका म्हणजे अनेकेश्वरवाद्यांच्या कारवायांची काळजी करू नका.
(१) माणसाच्या दोनच अवस्था असतात. सुख-सुविधा (ऐश-आराम) किंवा दुःख आणि संकट. सुख-संपन्न अवस्थेत अल्लाहचे आभार मानण्यावर जोर आणि दुःख यातनेत धीर-संयम राखून नमाजच्या माध्यमाने अल्लाहची मदत प्राप्त करण्यावर जोर आहे.
(१) अनेक ईश्वरांची उपासना करणारे आखिरतमध्ये आपले धर्मगुरू आणि धर्माचार्यांची विवशता आणि विभक्त होण्याने दुःख प्रकट करतील, परंतु हे दुःख त्यांना काहीच कामी येणार नाही. त्यांनी या जगात राहत असतानाच शिर्क (अल्लाहचे सहभागी ठरवण्या) पासून तौबा केली असती तर किती चांगले झाले असते!
(१) अर्थात सैतानाचे अनुयायी बनून अल्लाहने हलाल ठरविलेल्या गोष्टी हराम ठरवू नका, जसे मूर्तीपूजाकांनी केले की आपल्या दैवतांच्या नावाने सोडलेल्या जनावरांना स्वतःसाठी हराम करून घेत.
(१) आजदेखील बिदअतवाल्यांना (धर्मात नवनवीन रुढी रिवाज दाखल करणाऱ्यांना) समजविले जावे की या नव्या गोष्टींची धर्मात काहीच किंमत नाही, तर ते हेच उत्तर देती की या रुढी आमच्या पूर्वजांपासून चालत आल्या आहेत, वास्तविक त्यांचे पूर्वजदेखील दीन (धर्मा) च्या खऱ्या ज्ञानापासून अपरिचित आणि मार्गदर्शनापासून वंचित असू शकतात. यास्तव धार्मिक प्रमाण- पुराव्यांसमोर, वाडवडिलांचे आदेश मानणे इमामांचे अनुसरण (पुराव्याविना त्यांचे कथन मानणे) पूर्णतः भटकणे आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह मुसमानांना मार्गभ्रष्टतेच्या दलदलीतून बाहेर काढो.
(१) जेव्हा हत्या करणाऱ्याला ही भीती असेल की हत्येच्या बदली त्यालाही ठार केले जाईल, तर तो कोणाचीही हत्या करण्याचे धाडस करणार नाही आणि ज्या समाजात हत्येच्या बदल्यात हा नियम लागू होतो, तिथे ही भीती समाजाला हत्या आणि रक्तपातापासून सुरक्षित राखते. ज्यामुळे समाजात खूप शांती सुबत्ता राहते. याचे अवलोकन सऊदी अरबच्या समाजात केले जाऊ शकते. जिथे इस्लामी कायद्याचे पालन केल्यामुळचे अल्लाहच्या कृपा देणग्यांनी युक्त असे सुख-शांतीचे वातावरण आहे.
(१) ‘रोजा’ याचा अर्थ, सूर्योदयापूर्वी रात्रीच्या अंधारानंतर जो सफेद प्रकाश वातावरणात असतो, त्या वेळेपासून सूर्यास्तापर्यंत, अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी खाणे-पिणे, पत्नीशी समागम करणे यापासून स्वतःला रोखणे. इस्लामचा हा उपासनाप्रकार आत्मशुद्धीकरिता फार आवश्यक आहे. आणि म्हणूनच हा तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांवरही फर्ज (बंधनकारक) केला गेला होता.
(१) हे अशा माणसाबद्दल सांगितले गेले आहे ज्याच्याजवळ एखाद्याची काही ठेव किंवा मिळकत असावी आणि मालकाजवळ कसलाही पुरावा नसावा की ज्या आधारे तो न्यायालयातर्फे आपल्या बाजूने निर्णय करेल. अशा प्रकारे दुसऱयचा हक्क मारणे, सरासर अत्याचार आणि हराम आहे. असा मनुष्य अल्लाहच्या न्यायालयात अपराधी ठरेल. (इब्ने कसीर)
(१) या आयतीत पहिल्यांदा त्या लोकांशी लढण्याचा आदेश दिला गेला आहे, जो नेहमी मुसलमानांना ठार मारण्याचा इरादा राखतात, तरीही अतिरेक करण्यापासून रोखले गेले आहे. याचा अर्थ असा की लढताना अतिरेकाची सीमा गाठू नका, अमानवीय अत्याचार करू नका. स्त्रिया, लहान मुले, वृद्ध वगैरे ज्यांचा लढाईत सहभाग नाही त्यांना ठार करू नका. झाडे, घरेदारे, मुकी जनावरे यांना मारून टाकणे किंवा जाळणे वगैरे आततायी गोष्टी आहेत. हा अतिरेक करण्यापासून दूर राहा. (इब्ने कसीर)
(१) ‘तशरीकचे दिवस’ म्हणजे जिलहिज्जा महिन्याची ११, १२ आणि १३ तारीख. या दिवसांत अल्लाहचे स्मरण करण्याशी अभिप्रेत उंच स्वरात, पैगंबर (स.) यांच्या आचरण शैलीनुसार ठराविक तकबीर म्हणणे. फक्त फर्ज नमाजनंतर नव्हे (जसे एका अस्पष्ट हदीसद्वारे प्रसिद्ध आहे), किंबहुना प्रत्येक क्षणी ही तकबीर पढली जावी (अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर व लिल्लाहिल हम्द). जमरातला खडे (कंकरी) मारताना प्रत्येक कंकरीसह तकबीर पढणे, पैगंबर (स.) यांच्या आचरण शैलीनुसार आहे.
(१) अर्थात रागाच्या भरात अशी शपथ घेऊ नका की मी अमुक एका माणसाशी भलाईचा व्यवहार करणार नाही, अमुक एका माणसाशी बोलणारा नाही, अमक्या माणसांच्या दरम्यान समझोता घडवून आणणार नाही. अशा प्रकारच्या शपथांबाबत हदीसमध्ये उल्लेखित आहे की अशा शपथा जरी घेतल्या गेल्या तरी त्या तोडून टाका आणि मग शपथांचे प्रायश्चित (कफ्फारा) (शपथ घेतल्यानंतर ती तोडल्याबद्दलची शिक्षा) अदा करा (शपथेच्या प्रायश्चित्ताकरिता पाहा सूरह अल मायदा - आ.क्र. ८९)
(१) या भूतकालीन घटना, ज्यांचे ज्ञान, पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित पवित्र कुरआनाच्या माध्यमाने साऱ्या जगाला होत आहे. हे मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) निःसंशय, तुमच्या प्रेषित्वाचा आणि सत्यतेचा पुरावआ आहे, या घटनांचे वर्णन ना एखाद्या ग्रंथात केले गेले आहे, ना कर्णापकर्णा ऐकिवात आहे, ज्यावरून हे सिद्ध होते की या अपरोक्षाच्या (गैबच्या) खबरी आहेत, ज्या वहयी अर्थात ईशवाणीद्वारे, अल्लाह पैगंबरावर उतरवित आहे.
(१) ‘मोजिजा’ म्हणजे अल्लाहने केलेले चमत्कार जे हजरत ईसा यांना प्रदान केले गेले होते. उदा. मृताला जिवंत करणे वगैरे. ज्याचे स्पष्टीकरण सूरह आले इमरानमध्ये येईल. ‘पवित्र आत्म्या’शी अभिप्रेत जिब्रील होय, जसे की पूर्वीही उल्लेख आला आहे.
(१) ही ‘आयतुल कुर्सी’ होय. सहीह हदीस वचनामध्ये याचे मोठे महत्त्व सांगितले गेले आहे. उदा. ही कुरआनातील सर्वांत महान आयत आहे. रात्री हिचे पठण केल्याने माणूस सैतानापासून सुरक्षित राहतो. प्रत्येक नमाजनंतर हिचे पठण केले पाहिजे. (इब्ने कसीर)
(१) मूळ शब्द ‘नज़र’ अर्थात नवस मानणे की माझे अमुक एक काम झाले किंवा दुःख दूर झाले तर मी अल्लाहच्या मार्गात एवढे दान करीन. असा नवस पूर्ण करणे आवश्यक आहे. जर एखाद्या अवज्ञा आणि अनुचित कामाचा नवस मानला असेल, तर तो पूर्ण करणे जरूरी नाही. नवसदेखील नमाज-रोजासारखी उपासना आहे. यास्तव अल्लाहशिवाय दुसऱ्याचा नवस मानणे शिर्क आहे. जसे आजच्या काळात प्रसिद्ध मजारींवर नवस आणि भेट-नजराने चढविण्याचे काम चालू आहे. अल्लाह आम्हाला या शिर्कपासून वाचवो.